Blogger Widgets
||श्री राम समर्थ||
||जय जय रघुवीर समर्थ||

Saturday, May 12, 2012

श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -



श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -


श्रवण मननाचा विचार | निजध्यासे साक्षात्कार | रोकडा मोक्षाचा उधार | बोलोची नये ||१७-३-३ ||


जे श्रवण केले ते मनन करून विचार वाढवावा .त्यानंतर जे मिळवायचे आहे [माणसाचे सर्वश्रेष्ठ ध्येय परब्रह्माची प्राप्ती ] त्याचा निदिध्यास धरून साक्षात्कार करून घ्यावा .ह्याची देही ह्याची डोळा ,ह्याची जन्मात मोक्षप्राप्ती करून घ्यावी .आत्मसाक्षात्काराने रोकडी प्रचीती घ्यावी असे समर्थ सांगतात .पुढील जन्मात मोक्षप्राप्ती करून घेउ अशी उधाराची भाषा बोलू नये असे समर्थांचे सांगणे आहे ,कारण पुढचा जन्म कोणता मिळेल ते सांगता येत नाही.


स्वप्नी जे देखिले रात्री ।

स्वप्नी जे देखिले रात्री । ते ते तैसेचि होतसे । हिंडता फिरता गेलो । आनंदवनभूवनी ॥ विघ्नांच्या उठिल्या फौजा । भीम त्यावरी लोटला । घर्डिली, चिर्डिली रागे । आनंदवनभूवनी ॥ खौळले लोक देवांचे । मुख्य देवचि उठिला । कळेना काय रे होते । आनंदवनभूवनी ॥ बुडाले सर्वही पापी । हिंदुस्थान बळावले । अभक्तांचा क्षयो झाला । आनंदवनभूवनी ॥ त्रैलोक्य गांजिले मागे । विवेकी ठाउके जना । कैपक्ष घेतला रामे । आनंदवनभूवनी ॥ बुडाला औरंग्या पापी । म्लेंच्छ संहार जाहला । मोडिली मांडिली क्षेत्रे । आनंदवनभूवनी ॥ उदंड जाहले पाणी । स्नान संध्या करावया । जप-तप-अनुष्ठाने । आनंदवनभूवनी ॥ रामवरदायिनी माता । गर्द घेउनी ऊठिली । मर्दिले पूर्वीचे पापी । आनंदवनभूवनी ॥ भक्तांसि रक्षिले मागे । आताहि रक्षिते पहा । भक्तांसि दीधले सर्व । आनंद 


||जय जय रघुवीर समर्थ ||