समर्थांनी सरांग्पुरला पाहिलं, की एका सरोवरात ६० ब्राम्हण उभे राहून काही तरी अनुष्ठान करत होते.
समर्थांच्या बरोबर त्यांचा लाडका शिष्य उद्धव होता.
समर्थांच्या सांगण्यावरून उद्धवने त्या ब्राम्हणांची भेट घेतली आणि अनुष्ठानाचे प्रयोजन विचारले.
सारंगपुरच्या यवन अधिकाऱ्याने दुष्काळासाठी या साठ्ही ब्राम्हणांना वेठीला धरले होते.
त्या ब्राम्हणांना पाऊस पडेपर्यंत घरी जाता येणार नव्हत.
पाऊस पडावा म्हणून त्यांना सक्तीने अनुष्ठानाला लावले होते.
हे सर्व प्रकरण कळल्यावर समर्थांनी त्या सरोवराशेजारील डोंगरावर हनुमंताची मूर्ती तयार केली.
त्या मूर्तीवर भगवे वस्त्र ठेवले आणि ब्राम्हणांना सांगितले कि, तुम्ही जर या हनुमंताला महारुद्राचा अभिषेक केला तर नक्की पाऊस पडेल. ब्राम्हणांना मोठी आशा वाटली.
समर्थाचे तेज पाहून त्यांनी मोठ्या श्रद्धेने हनुमंताला महारुद्राचा अभिषेक केला.
त्यासरशी धो-धो पूस सुरु झाला.
ब्राम्हण आनंदले.
त्यांची सुटका झाली.
ही वार्ता कळताच निजामाबाद्च्या सुलतानाने समर्थांना सन्मानपूर्वक निजामबादला नेले.
त्यांना मठासाठी ५० एकर जमीन दान दिली.
तिथे समर्थांनी प्रभू रामचंद्रांचे मंदिर बांधले आणि उद्धवस्वामींची मठपती म्हणून नियुक्ती केली.
याच उद्धवांनी निजामबादहून समर्थांना पत्र लिहिले.
त्यात प्रार्थना केली -
"मला वाटते अंतरी त्वां वसावे |
तुझ्या दासबोधासी त्वां बोधवावे |
अपत्यापरी पाजवी प्रेमरसा |
महाराज्या सद्गुरू रामदासा ||'
Wednesday, May 16, 2012
३५. सारंगपुरच्या मारुतीची कथा
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment