Blogger Widgets
||श्री राम समर्थ||
||जय जय रघुवीर समर्थ||

Saturday, May 19, 2012

अफझुल्याच्या लढ्यासमयी, अवघा मावळ एक झाला,


अफझुल्याच्या लढ्यासमयी, अवघा मावळ एक झाला,
परि त्यातून एक सर्वांतूनि आगळा राहिला,
स्वराज्याचा तो गद्दार पहिला,
नाव तयाचे खंडोजी खोपडा!

म्हणे काय वाचतो हा शिवराया,
मारिल यासे हा खान अफझुल्ला,
परि त्याचा अंदाज चुकला,
खान स्वतःच गर्दिस मिळाला!
खोपडा भय खाउन पळाला,

रोष शिवरायांचा ओढावला!
शरण अखेर येता जाहला,
कन्होजींकरवी शब्द लाविला! (कान्होजी जेधे)
(शिवरायांच्या) नजरेला नजर तो देता जाला,
क्षणात खोपडा पूरता भेदरला,

राजांचा तो हुकूम सुटला,
पाय डावा अन् हात उजवा (याचा) छाटावा!
राजे सखोंबीतसे जेध्यांना
"गद्दाराला माफी कैसी? उद्या ऐसे अनेक जन्मती,
स्वराज्यासी हि किड ऐसी, आम्हास ना खपणारी!
शब्द तुमचा म्हणून जिता सोडिला, नातरी छाटले असते मुंडक्याला!"

जेधे बोलला मनाला, "कैसा जाणता राजा लाभला, केवढा थोर विचार वदला!
याचे तो हृदयात अंगार फुलला!...
याचे तो हृदयात अंगार फुलला...!!"

|| जय जिजाऊ ,जय शिवराय , जय महाराष्ट्र || 


No comments:

Post a Comment