Blogger Widgets
||श्री राम समर्थ||
||जय जय रघुवीर समर्थ||

Saturday, May 19, 2012

पराक्रमाला पंख नवे......!


 भगव्या साम्राज्याचे धगधगते निखारे आणि ज्वलंत निर्भिड युग्योद्धे
राजे छत्रपति संभाजीराजे भोसले यांची आज जयंती....
-----------प्रासंगिक-----------------------

करोडो इतिहासाच्या पानांचा भव्य दिव्य मुजरा...............
एक लखलखता झंजावात.....जय....राजे.......

छत्रपति संभाजीराजे भोसले -

छत्रपति संभाजी, एक ज्वलंत व्यक्तिमत्व, शिवरायांचा छावा.थोरले छत्रपति, सईबाई आणि जिजाउंच्या काळजाचा तुकडा। येसूबाई दुर्गाबाईंच्या कपाळी चमकणारा महातेजस्वी भास्कर, ज्याला आपल्या ओंजळित घेताना मृत्यु सुद्धा हळहळला असेल, प्रत्यक्ष यमधर्माचेही डोळे पाणावले असतील, आपल्या देहदानाने महाराष्ट्राला जीवदान देणारा आणि मरणोत्तर मराठी माणसाच्या मनावर राज्य करणारा राजा, संभाजी राजा !

केवळ सव्वा दोन वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्री सकल सौभाग्यसंपन्न सईबाई राणीसाहेब यांना देवाज्ञा झाली। थोरल्या छत्रपतिंचा भावगड आणि शंभुबाळावरचे मायेचे छत्र देवाने हिरावुन घेतले। बालपणीच आईविना पोरक्या बाळाची जबाबदारी घ्यायला शिवरायांच्या इतर राण्यांपैकी कुणीच पुढे सरसावले नाही, मग मात्र जिजाउंनी त्यांना आपल्या मायेखाली घेतले, त्यांच्या जागरुक नजरेखाली बाळराजांचे व्यक्तिमत्व घडत गेले. सोयराबाईंना पुत्रप्राप्ती होई पर्यंत त्याही शंभुराजांवर अतोनात प्रेम करत असतं. पण, राजारामचा जन्म झाला, आणि कालांतरानी छत्रपतिंनी शंभुराजांना युवराज्याभिषेक केला. संभाजीराजांच्या जन्मापासुन त्यांना अभिषेक झाला तेवढा त्यांच्या आयुष्यातील शांततेचा काळ सोडला तर इतर वेळी त्यांच्याविषयी सतत गैरसमजच पसरत गेले.

त्यांना अत्यंत अलौकिक असा पिता लाभला। जिजाबाईंचे मातृतुल्य प्रेम लाभले। रामायण, महाभारत, शास्त्रे, पुराणे, संस्कृत, संगीत, धनुर्विद्या य विषयांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. ते राजपुत्र असुन स्वभावत: च अत्यंत शुर असल्यामुळे त्यांना बालपणापासुन युद्धकलेचे शिक्षण मिळाले.

शिवरायांचा राज्याभिषेक होईपर्यंत शंभुराजांचे आयुष्य अत्यंत सुरळीत होते. त्यांना युवराजपद मिळाल्यापासून भोसले घराण्यात गृहकलह सुरु झाला आणि शंभुराजांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली; त्यांच्या जीवनात जो झंझावात सुरु झाला त्याचा शेवट, त्यांच्या दुदैवी अंतानेच झाला.

जीवनात यशस्वी होण्यासाठी कर्तुत्वाबरोबरच भाग्याचीही जोड लागते. शिवरायांच्या अंगी जसे अलौकिक कर्तुत्व आणि दूरदृष्टी होती, तसेच दैवही त्यांचा सतत त्यांच्या सोबत असे. त्यांनी अफज़लखानाची घेतलेली भेट तसेच आग्रा येथिल जीवावरचे संकट यांच्या अभ्यास केल्यावर एक गोष्ट फार प्रकर्षाने जाणवते; ती म्हणजे, शिवरायांना जर दैवाची साथ नसती तर?? महाराजांचे शौर्य, धैर्य, दूरदृष्टी, योजकता, कल्पकता अचाट होती पण त्यांच्या जोडीला दैवानेही हात दिला नसता तर या प्रसंगात काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही.
शंभुराजांचे जीवन याच्या अगदी उलट होते. ते शुर, धैर्यवान, धाडसी, साहसी, योजक, निपुण होते, पण त्यांचे एकुण आयुष्य पाहता असे वाटते की नियती त्यांच्या कपाळावर यशाचा कस्तुरी कुंकुमतिलक लावयला विसरली होती की काय?

युवराज्याभिषेक झालानंतर सैन्याच्या तुकडीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रशिक्षण मिळावे म्हणुन शिवरायांनी शंभुराजांच्या हाताखाली ५ ते १० हजार सैन्य देऊन रामनगर, जव्हार ई. राज्यांवर चढाई करण्यास पाठवले होते. त्याचबरोबर दिवाणी कामकाजामध्येही शंभुराजे सहभाग घेत असत. युवराज्याभिषेकानंतर शिवरायांच्या अनुपस्थितित त्यांनी स्वत:च्या सहीशिक्याने त्यांनी अनेक निवाडे केले आहेत, तंटे सोडविले आहेत.

महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत गादीच्या वारसाहक्काचा प्रश्न उपस्थितच झाला नव्हता, त्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे जिजाबाईसाहेब, पण राज्याभिषेकानंतर फक्त १३ दिवसांनी सर्वांवर आपल्या अस्तित्वाने, व्यक्तिमत्वाने, अधिकाराने वचक ठेवणारी राजमाता १७ जुन १६७४ रोजी निधन पावली. त्यानंतरच वारसाहक्काच्या प्रश्न ऐरणीवर आला, आणि त्याला कारण म्हणजे सोयराबाईंना पट्टराणीचा मान मिळाला असला तरी युवराजपद मात्र राजारामाकडे न जाता संभाजीराजांकडे आले; त्याचबरोबर त्यांचा वारसाहक्क मान्य झाला. त्यांची राजमाता बनण्याची स्वप्ने जरी खरी होणार असली तरी गादीवर येणारा राजा हा त्यांचा पुत्र नसणार होता हे एकच कारण सोयराबाईना शंभुराजांचा द्वेष करायला पुरेसे होते.






No comments:

Post a Comment