Blogger Widgets
||श्री राम समर्थ||
||जय जय रघुवीर समर्थ||

Saturday, May 19, 2012

मिर्झाच्या राजकारणास,

 
मिर्झाच्या राजकारणास,
राजा झाला मवाळ,
दिली मान्यता तहास,
निघाला औरंग्याच्या भेटीस!
होता औरंग्याचा वाढदिवस,

जमला होता दरबारास,
म्हणती जयाला "दिवाण-ए-खास"
येथेच भेटला राजा औरंग्यास!
राजा उभारला मनसबेस...
परी पाहून पुढे जयसिंगास,
उसळला तो नरसिंहासमान,
बोले "हा तर उघड अपमान,
नको मजला हि मनसब!"

निघाला राजा तडक,
अर्धा सोडून तो दरबार,
सरदार जाहले स्तंभित,
म्हणती काय हि आगळिक!

औरंग्या राहिला स्वस्थचित्त
परि चित्ती करितसे विचार,
"खरेच हा आहे शूर,
उगा ना पळाला मामा शाइस्त!"

औरंगजेब बोलला खुदासी,
"शुक्र है अल्लाचा, दुश्मन दिया तोभी शिवा जैसा!
याच्या तो वाणीतही विजा गर्जतात,
याच्या तो वाणीतही विजा गर्जतात ||


No comments:

Post a Comment