Blogger Widgets
||श्री राम समर्थ||
||जय जय रघुवीर समर्थ||

Saturday, May 19, 2012

पहाडाची छाती अन...चंद्राची शितलता.....राजे


पहाडाची छाती अन...चंद्राची शितलता.....राजे
छत्रपती संभाजी...!
महाराष्ट्राच्या इतिहासाचे...दिपस्तंभ...!!
"असेल काय सामर्थ्य ईतूके कोणा ठायी...!
ज्यांच्या पराक्रमाने चंदन झिजते पायी...!!"
छत्रपति संभाजी, एक ज्वलंत व्यक्तिमत्व,
शिवरायांचा छावा.थोरले छत्रपति, सईबाई
आणि जिजाउंच्या काळजाचा तुकडा। येसूबाई
दुर्गाबाईंच्या कपाळी चमकणारा महातेजस्वी भास्कर,
ज्याला आपल्या ओंजळित घेताना मृत्यु सुद्धा हळहळला असेल,
प्रत्यक्ष यमधर्माचेही डोळे पाणावले असतील,
आपल्या देहदानाने महाराष्ट्राला जीवदान
देणारा आणि मरणोत्तर मराठी माणसाच्या मनावर राज्य
करणारा राजा, संभाजी राजा !
केवळ सव्वा दोन वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्री सकल
सौभाग्यसंपन्न सईबाई राणीसाहेब यांना देवाज्ञा झाली।
थोरल्या छत्रपतिंचा भावगड आणि शंभुबाळावरचे मायेचे छत्र
देवाने हिरावुन घेतले। बालपणीच
आईविना पोरक्या बाळाची जबाबदारी घ्यायला शिवरायांच्या इतर
राण्यांपैकी कुणीच पुढे सरसावले नाही, मग मात्र
जिजाउंनी त्यांना आपल्या मायेखाली घेतले, त्यांच्या जागरुक
नजरेखाली बाळराजांचे व्यक्तिमत्व घडत गेले.
सोयराबाईंना पुत्रप्राप्ती होई पर्यंत त्याही शंभुराजांवर
अतोनात प्रेम करत असतं. पण, राजारामचा जन्म झाला,
आणि कालांतरानी छत्रपतिंनी शंभुराजांना युवराज्याभिषेक केला.
संभाजीराजांच्या जन्मापासुन त्यांना अभिषेक
झाला तेवढा त्यांच्या आयुष्यातील शांततेचा काळ सोडला तर
इतर वेळी त्यांच्याविषयी सतत गैरसमजच पसरत गेले.
त्यांना अत्यंत अलौकिक असा पिता लाभला। जिजाबाईंचे
मातृतुल्य प्रेम लाभले। रामायण, महाभारत, शास्त्रे, पुराणे,
संस्कृत, संगीत, धनुर्विद्या य विषयांचा त्यांनी सखोल
अभ्यास केला. ते राजपुत्र असुन स्वभावत: च अत्यंत शुर
असल्यामुळे त्यांना बालपणापासुन युद्धकलेचे शिक्षण मिळाले.



No comments:

Post a Comment