Blogger Widgets
||श्री राम समर्थ||
||जय जय रघुवीर समर्थ||

Sunday, May 13, 2012

॥ श्री मनाचे श्लोक ॥१५॥




मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी।
जितां बोलती सर्वही जीव मी मी॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥१५॥


अर्थ : - हा शब्द शंकररावांचा आहे, हे लक्षात ठेवा! उद्या माझ्या मोटारने मी तुमच्याकडे येणार, तेथे जेवणार. या माझ्या निश्चयात कसलाही फरक होणार नाही. शंकररावांचे मित्र हे आश्वासन ऐकून संतुष्ट झाले. शंकरराव बडे अधिकारी होते आणि त्यांच्याकडून त्यांच्या स्नेह्यांना काही काम करून घ्यायचे होते पण गोष्ट अशी होती की, शंकररावांनाही या स्नह्याकडून काही लाभ होता आणि म्हणूनचे त्यांनी हे निग्रहाचे आश्वासन दिले होते. शंकररावंाच्या पोटात दोन टॉयफॉईडचे जीवाणू हसत खिदळत यावेळी बसले होते. थोड्या वेळापूर्वीच, शंकररावांनी प्यालेल्या पाण्यातून ते शंकररावंाच्या पोटात उतरले होते. शंकररावांची ही बढाई ऐकून, नंतर पोटात गेलेल्या त्या दोघांपैकी एक टॉयफॉईडचा जंतू पोट धरूनधरून हसला. म्हणाला, “या मूर्खाचे कसले हे मत, आणि वचन? दोन तासांत हा आता आडवा होणार आहे. तो पाच-पंचवीस दिवस काही अंथरूणाबाहेर पडणार नाही. शंकररावंाचे मन आणि मत खोटे ठरले. जीवाणूंचे खरे ठरले. मी मीम्हणत मनुष्य ज्या कल्पना करतो, त्याचे त्याच्या शरीरावरही पुरते नियंत्रण नसते. रामदासा पंधराव्या श्लोकात या मीपणावर बोट ठेवून सांगतात की तुमचे कर्तृत्व, अहंकार, माया या सर्वांपेक्षामत्यूहे अधिक सत्य आहे. हे न जाणता, येतो तो मनुष्य आपला आपल्या मुलालाचिरंजीवम्हणून संबोधित राहतो. आपण आणि आपले आवडते सगळेच चिरंजीव राहणार आहोत, या मीपणात हा मनुष्य सर्व जन्म घालवतो.



No comments:

Post a Comment