Blogger Widgets
||श्री राम समर्थ||
||जय जय रघुवीर समर्थ||

Sunday, May 13, 2012

शीख धर्मगुरूंची भेट






समर्थ रामदास हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भारतभर फिरले.
ते श्रीनगरला असतांना योगायोगाने त्यांची भेट शिखांचे सहावे धर्मगुरू हरगोविंद यांच्याशी झाली.
हरगोविंद यांच्याबरोबर १००० सैन्य असायचे.
त्यांच्या कमरेला दोन तलवारी असत.
त्यांचा हा सर्व सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले.
समर्थांनी हरगोविंदांना विचारले - " आपण धर्मगुरू आहात. या दोन-दोन तलवारी आपण का बाळगता ?"
तेव्हा गुरु हरगोविंद म्हणाले - " एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शीलरक्षणासाठी".
समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले - "आणि हा सारा फौजफाटा ?"
त्यावर हरगोविंद म्हणाले - " धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे.
सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहे की,
केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही.
आपल्याला शस्त्रसज्ज झाले पाहिजे.
या जगात दुर्बल माणसाला काही किंमत नसते.
आपण बलशाली झाले पाहिजे."
समर्थांना हिमालयात प्रभू रामचंद्रांकडून धर्मसंस्थापनेसाठी प्रेरणा मिळाली होती.
त्यापाठोपाठ गुरु हरगोविंद यांनी त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली.
यानंतर समर्थांनी जागोजागी हनुमंताची मंदिरे उभी केली .
हनुमान हि शक्तीची देवता. हनुमान मंदिरात ते तरुणांना संघटीत करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत.
धार्मिक मनुष्य अनेकदा परमार्थाच्या नावाखाली दुर्बल होतो.
स्वामी विवेकानंद म्हणत असत -
"माझा वीरभाव आहे" समर्थ देखील सामर्थ्याचे उपासक होते.
कोणत्याही राष्ट्राला ताठ मानेने जगायचे असेल तर ते शस्त्रसज्ज असले पाहिजे. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या बांधवांना लष्करात भरती व्हायला सांगितले.







No comments:

Post a Comment